Posts

Showing posts from 2017

नातं नवरा-बायकोचं..

*_पुढे लिहिलेली कविता पुर्णपणे (अ) काल्पनिक असुन  तिच्यातील नवरा-बायको यांचा वास्तविकतेशी संबंध नाही. (जर तसा काही संबंध आढळून आल्यास शांत रहा. कारण तुम्ही त्याबद्दल काही बोलू शकत नाही)_* नवरा-बायको नात्यामध्ये बायकोचं नाणं खरं असतं, शांत रहावं अशा वेळी कारण हुज्जत घालणं बरं नसतं... उपदेशाच्या बोलाची कधी टाळाटाळ करु नये, चुकून सुद्धा बायकोची वस्तू गहाळ करु नये... जेवणाच्या तक्रारींना मुकाट्याने गिळायला शिका, सांगायच्याच असतील तरं, आधी पीठ मळायला शिका... कपड्यांच्या रंगसंगती तुम्ही कधीच ठरवू नका, रागावलेल्या बायकोला चुकूनही प्रेमाने भरवू नका... ठरवलेल्या Plan मध्ये बदल करुन फसु नका, गंभीर झालेल्या चेह-यावर उगीचच कधी हसू नका... भांडी मांडताना येणा-या आवाजात संगीत शोधा, खरेदी करा तिच्यासाठी, कपडे अगदी रंगीत शोधा... गोष्ट कोणती करताना बायकोकडे मानेचा बाक असतो, साध्या भोळ्या नव-याला तिच्या डोळ्यांचा धाक असतो... संसाराच्या ताटामध्ये, बासुंदी सारखी गोडी हवी, कधीतरी खरडा म्हणून, भांडणं ही थोडी हवी... आपले मुद्दे मांडण्याची कला तुम्हाला यायला हवी, स्वत:बरोबर बायकोची काळजी तुम्

सुविचार संग्रह ३

रोज अवतीभवती घडणा-या गोष्टी आपल्यावर नकळत संस्कार करत राहतात.  पण त्या मेंढ्यीच्या कळपात मेंढी बनून राहायच की चिखलात उमलणा-या कमळाप्रमाणे उमलत राहायच हे आपणच ठरवायच वाडकर शुभ सकाळ विक्रम वाडकर. सहसा, रात्र सरून गेल्यावर झोपेत आलेली स्वप्नं आठवत नाहीत. आणि काही स्वप्न पाहताना रात्र सरून जाते, पण झोपच लागत नाही. म्हणजेच झोपून राहायचे असेल तर स्वप्न पाहण्यात काय अर्थ आहे? आणि स्वप्न पाहीले तर ते पूर्ण होण्याआधी झोपणे व्यर्थ आहे. शुभ सकाळ विक्रम वाडकर. कोणताही माणूस परिपुर्ण नसतो. त्याचे काही गुण काही दोषही असतात. त्या दोषांना बाजुला सारून गुणांचे संगोपण करायला शिकले की दोष आपोआप दुर्लक्षित होतात. म्हणून सत्कर्म करा. शुभ सकाळ विक्रम वाडकर जगात जास्तीत जास्त प्रेमसंबंध हे एकमेकांचे वाद काढण्यामुळे टिकत नाहीत. प्रेमसंबंध तोपर्यंत टिकतात जोपर्यंत दोघेही विश्वास ठेवतात कि "आपल्याला आपल्या योग्यतेपेक्षा योग्य जोडीदार मिळाला आहे." शुभ सकाळ विक्रम वाडकर. जग हे तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही. त्यासाठी आधी तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल. दुनिया झुकती है, कोई झुक