ओघ


"येरे येरे पावसा" असं मन आता करत नाही...कारण तुझ्या आठवणींचा ओघ काही सरत नाही...

पाऊस येतो, स्मरणे देतो,
जाणीव मजला करुनी देतो,
तुझ्याशिवाय आयुष्याला अर्थच आता उरत नाही...

चिंब पावसात, हातात हात,
आठवणींची अशी बरसात,
आठवणींच्या हिंदोळ्यातुन मन काही तरत नाही....

रात्रभर, ओली सर,
शहारा फुलवी अंगावर,
आता भिजुनी देहाचा माठ असा भरत नाही....

"येरे येरे पावसा" असं मन आता करत नाही...कारण तुझ्या आठवणींचा ओघ काही सरत नाही...
कारण तुझ्या आठवणींचा ओघ काही सरत नाही...
----- विक्रम वाडकर (१८-मे-२०१२)


Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १