===तुझी आठवण===


पाउस जेव्हा येतो तेव्हा, हिरवळ मनात दाटते,
गवताच्या फांदीवरले दवबिंदु व्हावेसे वाटते,
इतक्यात तुझी आठवण माझ्या मनी येते,
डोळ्यांचा मेघ होतो अन् आसवेच फ़क्त देते ||धृ||

हृदय भरून आल्यावर एकच दृश्य दिसते,
रक्तात भिजलेल्या प्रीतीची कट्यार काळजात घुसते,
विसरणार तुला मी अस किती वेळा म्हणतो,
आणि प्रत्येकवेळी तिचाच चेहरा डोळ्यासमोर आणतो||१||

कितीतरी जन बोलले तिचा असेल काही स्वार्थ,
पण हे लक्षात न घेता मी प्रेम केल निस्वार्थ,
काहीही न बोलता तू मला सोडून गेली,
चेहरयाचे शब्द केले अन डोळ्यांची तलवार केली||२||

इतके वार सहन करून अजुन मी शांत आहे,
तुझ्या प्रेमाचा सुगंध अजून माझ्या आसवांत आहे,
दूर जा कितीही तू, माझा नेहमीच आर्शीवाद असेल,
कधी मागे वलून पाहिलास तर नेहमी माझा हात दिसेल||३||

माझ्या मनाचा ताबा आता कोणी घेऊ नका,
जरी हक्क असला तरी माझ्या आयुष्यात येऊ नका,
माझी कविता वाचून तुम्ही एकच सल्ला घ्या,
खरं प्रेम केलत तर शेवटपर्यंत साथ द्या||४||

=====विक्रम वाडकर=====

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १