किती दिवस झाले.....


ही कविता मी कोणाच्यातरी प्रेरणेतुन लिहिली आहे .......



आज माझ्या प्रेमाला वर्ष पूर्ण झालं ;
काय सांगू तुम्हाला ...
किती दिवस झाले मी तिचं तोंड नाही पाहिलं..!!!!!!

जेव्हा पण भेटायची मला , तीच कालीज भरून यायच ,
तासन-तास आम्ही फ़क्त एकमेकांनाच पहायच,
मग डोळ्यातील समुद्राला उधाण भरून यायच,
डोळे सोडून-काठ मोडून ,अश्रु बनुन वहायच,
खुप दिवस झाले ते पाणी नाही वाहिलं..||१||

माझी आठवण आली की ती मला फ़ोन करायची,
मग माझ्या तोंडातील प्रत्येक शब्दासाठी झुरायची,
बोलता बोलता अचानक हमसून रडायची,
आणि मलाही स्वतःची भ्रांत पडायची,
अजुन बोलायच होत जे दुःख मनात राहीलं..||२||

मला बघताना ती डोळे मिटून घ्यायची,
का म्हणुन विचारल्यावर एकच उत्तर द्यायची,
"तुला माझ्या डोळ्यामधे साठवून ठेवयाचय ",
असं म्हणुन स्वतःच सैरभैर व्हायची,
तिच्या आठवनिंनी मला खुप खुप त्राहिलं..||३||

तिच्या डोळ्यातील अधीरतेची कारण जेव्हा कळली,
प्रत्येक अवघड कोड्याची उत्तरं तेव्हा जुळली,
'तुझी वाट बघेन , भेटू पुढच्या जन्मी ',
असं बोलून तिची प्राण ज्योत मावळली,
याच हातांनी महिन्यापूर्वी तीच शरीर दाहिलं..||४||

=========विक्रम वाडकर=========

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १